Mahesh Urban Bank Bharti 2025
Mahesh Urban Bank Bharti 2025 : लातूर येथील महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदपूर यांनी अधिकारी/शाखाधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. एकूण ५ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन (टपालाद्वारे) किंवा ऑनलाईन (ई-मेलद्वारे) 23 जून 2025 या अंतिम मुदतीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
भरतीची माहिती
- पदाचे नाव: अधिकारी / शाखाधिकारी
- पदसंख्या: एकूण ०५ जागा
- शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. खालील शाखांमधील उमेदवार अर्ज करू शकतात:- M.Com (कॉमर्स)
- M.Sc (सायन्स)
- M.A (आर्ट्स)
- MBA (फायनान्स/मार्केटिंग)
- CAIIB (Certified Associate of Indian Institute of Bankers)
- नोकरीचे ठिकाण: अहमदपूर, जिल्हा लातूर
Mahesh Urban Bank Bharti 2025
अर्ज करण्याची पद्धत
- उमेदवारांना अर्ज ऑफलाइन किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत भरती जाहिरातीचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे.
ऑफलाइन अर्जासाठी:
- अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा: महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., अहमदपूर
बसवेश्वर चौक, कॉलेज रोड, अहमदपूर,
जिल्हा लातूर – ४१३५१५
ऑनलाईन अर्जासाठी:
- अर्ज ई-मेलद्वारे खालील पत्त्यावर पाठवावा:
- ई-मेल पत्ता: ceo@mucbahmedpur.co.in
महत्वाच्या सूचना
- अर्ज फॉर्म पूर्णपणे भरलेला असावा आणि आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची प्रत संलग्न असावी.
- अर्ज केवळ योग्य पत्त्यावर आणि वेळेत सादर झाल्यासच ग्राह्य धरला जाईल.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अपूर्ण, चुकीच्या माहितीसह सादर केलेले अर्ज नाकारले जाण्याची शक्यता असते.
Mahesh Urban Bank Bharti 2025
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025

महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी“ कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.