Nagar Parishad Pen Raigad Bharti 2025
Nagar Parishad Pen Raigad Bharti 2025 : पेण नगरपरिषद, रायगडने शहरस्तरीय तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ (City Level Technical Specialist – CLTC) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही एकच पदभरती असून, इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर नियत तारखेपूर्वी पाठवावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 जून 2025 आहे.
पदाची माहिती:
- पदाचे नाव: शहरस्तरीय तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ (CLTC)
- पदसंख्या: 01
- कामाचे ठिकाण: पेण, जिल्हा रायगड
- वेतनश्रेणी: रु. 35,000/- प्रतीमहिना
Nagar Parishad Raigad Bharti 2025
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) या शाखेतील BE/B.Tech/M.E/M.Tech पदवी प्रथम श्रेणीत आणि मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असावी.
टीप: शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिक तपशीलांसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व पूर्ण भरलेली असावी. अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज फेटाळण्यात येईल.
- अर्ज 20 जून 2025 च्या अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. त्या नंतर आलेले अर्ज अमान्य ठरवले जातील.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्याधिकारी, पेण नगरपरिषद, हुतात्मा भाई चौक, एम.जी. रोड, पोस्ट-तालुका – पेण, जिल्हा – रायगड.
- अर्ज पाठविण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
Nagar Parishad Bharti 2025
महत्त्वाच्या सूचना:
- अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावीत.
- उमेदवाराची पात्रता, अनुभव, आणि आवश्यक गुणवत्ता मूळ जाहिरातीनुसार पडताळण्यात येईल.
- ही भरती पूर्णत: करार पद्धतीने करण्यात येणार आहे.
- उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाऊ शकते.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जून 2025

महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी“ कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.